Academic literature on the topic 'उद्रेक'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'उद्रेक.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "उद्रेक"

1

हजारे, डॉ. मारुती चांगदेव. "महाराष्ट्रातील सध्यकालीन जात आणि राजकारण". International Journal of Advance and Applied Research 10, № 6 (2025): 587–92. https://doi.org/10.5281/zenodo.15487826.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना:</strong> भारतीय लोकशाही ही विविधतेत एकतेचा अनोखा नमुना आहे. इथे धर्म, जात, भाषा, प्रांत, वंश या विविध आधारांवर समाज विभाजित असतानाही एक सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताने जगासमोर एक यशस्वी उदाहरण उभं केलं आहे. तथापि, या विविधतेतल्या काही गोष्टी आजही लोकशाहीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. त्यापैकी जातीव्यवस्थेचे राजकारणाशी असलेले घट्ट संबंध हे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय वास्तव आहे. महाराष्ट्र ही समाजसुधारणेची भूमी मानली जाते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी जातीच्या रूढ व्यवस्थेला आव्हान दिले. शिक्षण, समता आणि आत्मसन्मानाच्या माध्यमातून त्यांनी शोषित, वंचित आणि मागास समाजघटकांना सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. परंतु, असे असूनही जात हा घटक आजही निवडणुकांमध्ये, नेत्यांच्या भाषणांमध्ये, पक्षाच्या धोरणांमध्ये आणि राजकीय समीकरणांमध्ये खोलवर रुजलेला आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या वेळी कोणती जात कोठे प्रभावी आहे, त्यांची मागणी काय आहे, त्यांना कोणता उमेदवार हवा आहे, इ. गोष्टींचा अभ्यास करून रणनीती आखतात. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीचा वापर कधी सूक्ष्मपणे तर कधी उघडपणे केला जातो. काही वेळा जातीनिहाय आरक्षणाच्या मागण्या, किंवा एखाद्या समाजाचा उद्रेक, हे राजकीय दबावगट म्हणूनही पुढे येतात. त्यामुळे राजकारणाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक म्हणून जात कायम चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर जातींच्या राजकीय अस्मितेचे प्रश्न चव्हाट्यावर आलेले आहेत. मराठा आरक्षणाचा संघर्ष, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मागणी, वंचित बहुजन आघाडीचा उदय, आणि भाजप व इतर पक्षांच्या जातीय समीकरणातील बदल हे सारे बदलते राजकारण दर्शवतात. या पार्श्वभूमीवर "महाराष्ट्रातील सध्याकाळीन जात आणि राजकारण" या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. हा संशोधन पेपर लिहिण्यापाठीमागचा हेतू म्हणजे केवळ जात-पक्ष यांचे संबंध तपासणे नसून, सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्यं आणि राजकीय समतेच्या दृष्टीने जातीचे काय स्थान आहे हे स्पष्ट करणे आहे. नव्या पिढीने याकडे केवळ अभ्यासकाच्या नव्हे तर सजग नागरिकाच्या नजरेने पाहणे आवश्यक आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

पोखरेल Pokhrel, केशवराज Keshabraj. "कर्तव्य कथाका पात्रमा साङ्ख्य दर्शनका त्रिगुणको प्रभाव {The effect of the triple of Sankhya philosophy on the characters of the duty story}". Sotang, Yearly Peer Reviewed Journal 1, № 1 (2019): 7–15. http://dx.doi.org/10.3126/sotang.v1i1.45832.

Full text
Abstract:
प्रस्तुत आलेखमा गुरूप्रसाद मैनालीरचित कर्तव्य कथाका प्रमुख पात्रका चारित्रिक क्रियाकलापलाई सांख्यदर्शनद्वारा प्रस्तावित त्रिगुणसम्बन्धी सैद्धान्तिक पर्याधार निर्माण गरी समस्याअनुरूप खोजिएका साक्ष्यका आधारमा विश्लेषण गरिएको छ । यस विश्लेषणबाट मुरलीधरको चरित्रमा जिउनी खेतको विषयमा गरिएको मुद्दामामिलाका घटनाका साथै सनातन धर्मसंस्कृतिप्रतिको अनुराग, कर्तव्यबोध र जिम्मेवारीको पालनबाट रजोगुण तिरोहित भई सत्वगुण उद्रेक भएको देखिन्छ भने श्रीधरका चारित्रिक क्रियाकलापमा सनातनधर्मसंस्कृतिप्रति अनास्था, सत्ता र शक्तिको उन्मादका घटनामा तमोगुण, छोराको वैवाहिक कार्यक्रममादाजुभाउजूलाई उपेक्षा गरेका घटनामा रजोगुण एवम् नबोलाउँदा नबोलाउँदै पनि दाजु छोराको बिहेमा गएरकुलपरम्पराको रीतिरिवाज पालना गरेका घटनाबाट कृतकार्यप्रति पछुतो मान्दै क्षमायाचना गरेका सन्दर्भमा सत्वगुणको मात्रा अधिक देखिन्छ । विनानिम्ता वैवाहिक कार्यमा जान नहुने कमलाको प्रस्तुतिमा आक्रोश रप्रतिशोधको भाव झल्किएको हुँदा यसबाट उनको चारित्रिक कार्यकलापमा रजोगुणको मात्रा रहेको छ । पौरस्त्य दर्शनको यही त्रिगुणवादी मान्यतामा आधारित भई प्रमुख पात्रका चारित्रिक कार्यकलापको तुलनात्मक अध्ययन गर्दा भाइ भए भरोस गाई भए गोरसको उखान चरितार्थ भएकाले तम र रजोगुणको गोपन भई सत्वगुणको मात्रा अधिक रहेकाले प्रस्तुत कथालाई आदर्शवादी मान्ने आधार पुष्टि हुने देखिन्छ ।&#x0D; {In the present article, the characteristic activities of the main characters of the Duty Story written by Guruprasad Mainali have been analyzed on the basis of the evidence sought according to the problem by constructing the theoretical basis for the three qualities proposed by Sankhyadarshan. From this analysis, it is seen that in the character of Muralidhar, along with the incidents in the case of Jiuni Khet, as well as devotion to Sanatan religion and culture, sense of duty and observance of responsibility, Rajoguna has disappeared and Sattva Guna has emerged On the other hand, in Shridhar's characteristic activities, in the cases of disbelief in traditional religion and culture, in the incidents of power and power frenzy, in the incidents of neglecting the son's marriage program, in the incident of Rajogun, and in the incident of not calling him, Kamala, who should not go to the wedding without any reason, has a sense of resentment and revenge, which adds to the amount of Rajogun in her characteristic activities Has been A comparative study of the character activities of the protagonists based on this triune belief of Eastern philosophy seems to confirm the premise that the present story is considered idealistic as the proverbial character of Goras is the character of brother and brother is trustworthy.}
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा.डॉ., देशमुख एस.बी. "परभणी जिल्हयातील पर्यटन स्थळे". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 48–51. https://doi.org/10.5281/zenodo.7053699.

Full text
Abstract:
<strong>सारांश</strong><strong> :- </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; आपल्या परिसरातील काही नैसर्गिक, सांस्कृतिक, एतिहासिक, मानवनिर्मित घटकांचा अभ्यास प्रत्यक्ष क्षेत्र भेटीद्वारे करता येतो. पर्यटनाचा अभ्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे केला असता स्थानिक पर्यावरणाचे भौगोलिक घटक आणि नैसर्गिक व सांस्कृतिक घटक यांचा सहसंबंध अभ्यासता येतो. क्षेत्र भेटीद्वारे अभ्यास करताना अभ्यासचा उद्देश अभ्यास पद्धती, अपेक्षित निरीक्षण आणि समस्या संकलीत माहितीचे प्रश्न प्रकरण, अनुमान, समस्यावर उपाय सुचविणे अशा स्वरुपाचे लेखन पुराव्याचे असते. स्थानिक समसनुसार उद्देश व अभ्यास पद्धती यात बदल ही असतो. शोध निबंधासाठी घेतलेला परभणी जिल्हा हा प्राकृतिक व सांस्कृतिक घटकाच्या आधारे पर्यटन स्थळाची माहिती स्पष्ट करता येते.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

प्रा., डॉ. बबन शामरावजी शेलकर. "शाश्वत विकास उद्दिष्टे आणि राष्ट्रीय शिक्षणधोरण". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 349–52. https://doi.org/10.5281/zenodo.15250990.

Full text
Abstract:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; शाश्वत विकास हा वाढ आणि मानवी विकासाचा एक दृष्टीकोन आहे. ज्यांचा उद्देश भविष्यातील पिढयांचा स्वत:च्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान काळाच्या गरजा पूर्ण करणे आहे. उद्दिष्ट असा आहे की, असा समाज निर्माण करणे, जिथे राहणीमान आणि संसाधने ग्रहयाच्या अखंडतेला धक्का न लावता मानवी गरजा पूर्ण करतील. तसेच शाश्वत विकासाचा उद्देश अर्थवयवस्था व पर्यावरण आणि समाजाच्या गरजा संतुलीत करणे आहे. 1987 मध्ये ब्रुंडटलँड अहवालाने शाश्वत विकासाची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत केली. शाश्वत विकास हा शाश्वतेच्या कल्पनेशी जुळतो जो एक मानक संकल्पना आहे. युनोस्कोने या दोन्ही संकल्पनामधील फरक खालीलप्रमाणे मांडला आहे. शाश्वतेचा विचार अनेकदा दिर्घकालीन ध्येय म्हणून केला जातो. तर शाश्वत विकास म्हणजे ते साध्य करण्यासाठी अनेक प्रक्रिया आणि मार्ग.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

चेडे, श्री. जगदीश योगीराज, та प्रा.डॉ अफसर शेख रशीद शेख. "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोविड- १९ लॉकडाउन पूर्वी व व दरम्यानच्या शारीरिक हालचालींचा सर्वेक्षणात्मक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 17(A) (2025): 497–501. https://doi.org/10.5281/zenodo.15202136.

Full text
Abstract:
<strong>सारांश:&nbsp; </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोविड-१९ पूर्वी व दरम्यानच्या शारीरिक सक्रियता त्याचा अभ्यास करणे हा आहे. या संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीसंलग्नित महाविद्यालयातील विद्यार्यांची सहेतुक न्यादर्श पद्धतीने निवड करण्यात आली. माहिती संकलनासाठी शिक्षक निर्मित प्रश्नावली चा वापर करण्यात आला.&nbsp; प्रश्नावली मध्ये एकूण ११ प्रश्नांचा समावेश होता व त्याची उत्तरे रिकाम्या जागा या पद्धतीचे होते. ही प्रश्नावली तयार करून प्रत्येक्ष महाविद्यालयामध्ये जावून त्यांच्याकडून भरून घेण्यात आली.&nbsp; पूर्वी आणि लॉक डाऊन दरम्यान प्रश्न क्रमांक १,२,३,४, आणि ५ अनुक्रमे (८८.००, ७४.००), (४९.००,४२.५०), (५१.००,४५.००,), (४५.००,३८.००,) आणि (५२.००,६६.००) मध्ये लॉकडाऊन चा परिणाम दिसून आला प्रश्न क्रमांक ६ मध्ये १०४ (५२.००) विद्यार्थ्यांचा उद्देश हा शारीरिक सुदृढता&nbsp; आहे. असा दिसून आला. या सर्व प्रश्नांच्या विश्लेषण यावरून असे दिसून आले की विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालीवर लॉकडाऊन पूर्वीच्या टक्केवारी पेक्षा लॉक डाऊन दरम्यानच्या टक्केवारी मध्ये घट झालेली आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

शुभम, रेवणशेटे, та डॉ. प्रतिभा स. काळमेघ प्रा. "कृषी विकासात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे महत्व". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 387–91. https://doi.org/10.5281/zenodo.15251041.

Full text
Abstract:
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) ही भारत सरकार द्वारा कृषी क्षेत्रात सुधारणा आणि शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य विमा कवच पुरवणे आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा इतर प्रकारच्या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होऊ शकेल.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

कोटुरवार, डॉ. दीपक द., та राजकुमार रामरावजी वाघ. "माहिती अधिकार कायदा प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचे साधन - एक चिकित्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 60–63. https://doi.org/10.5281/zenodo.15332418.

Full text
Abstract:
<strong>सारांश (ABSTRACT):</strong> &nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;या शोधनिबंधामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या यशस्वीतेसाठी व पारदर्शकतेसाठी &nbsp;काही सूचना व उपाययोजना सांगितलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी कारंजा या ३ (तीन) तालुक्यात माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकता आनण्याच्या दृष्टीने या कायद्याच्या मार्गातील अडथळे व समस्यांचा शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. त्या दृष्टीने विविध बाबींचा शोध व चिकित्सक विश्लेषण करून माहिती अधिकार कायद्यात आणखी पारदर्शकतेच्या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सोयीनुसार नमुन्याद्वारे प्रतिसादकांची निवड करण्यात आली व त्यानुसार निवडलेल्या नमुन्यांच्या प्रतिसादाचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी व जबाबदार लोकशाहीची निर्मिती करण्यासाठी प्रशासनात जनतेचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहेत. जनतेचा सहभाग वाढवून प्रशासन सक्रिय व्हावे व माहिती अधिकाराची माहिती तळागाळापर्यंत पोहोचून माहिती अधिकार कायद्याची पारदर्शकतेच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करून त्या मार्गातील समस्या सोडविणे व त्यावर उपाययोजना करणे हा या रिसर्च पेपरचा उद्देश आहे.&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

डॉ., गुलशन डी. कुथे. "राष्ट्रीय शैक्षणिकधोरण (NEP- 2020) आणि ग्रंथालयांची भूमिका". International Journal of Advance and Applied Research S6, № 2 (2025): 483–87. https://doi.org/10.5281/zenodo.15560967.

Full text
Abstract:
<em>केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ला मान्यता दिली. 2040 पर्यंत भारताच्या शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश भारताला संपूर्ण जगात जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा आहे. या संशोधन लेखात संशोधक शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर ग्रंथालयांमध्ये होणारे बदल आणि भूमिका दाखवतात</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

भालसिंग, ऋषिकेश बाबासाहेब. "प्राचीन भारतीय खेळ आणि त्यांचे शारीरिक शिक्षणात योगदान: एक चिकित्सक अभ्यास". International Journal of Advance and Applied Research 6, № 26 (2025): 101–2. https://doi.org/10.5281/zenodo.15255199.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा</strong><strong>:</strong> प्राचीन भारतीय खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर ते शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रभावी साधने होती. या संशोधनाचा उद्देश प्राचीन भारतीय खेळांचे शारीरिक शिक्षणातील योगदान अभ्यासणे हा आहे. इतिहासात, कुस्ती, मलखांब, योग, धावणे, भालाफेक यांसारख्या खेळांनी तंदुरुस्ती आणि कौशल्ये वाढवण्यास हातभार लावला आहे. आजच्या आधुनिक शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्याची गरज असल्याचे या चिकित्सक अभ्यासातून स्पष्ट होते .
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

डॉ., के. व्ही. ढवळे. "शाश्वत विकासासाठी नवोपक्रम आणि व्यापार धोरणे". International Journal of Advance and Applied Research S6, № 18 (2025): 301–2. https://doi.org/10.5281/zenodo.15250598.

Full text
Abstract:
शाश्वत विकास ही आधुनिक काळातील एक महत्वपूर्ण संकल्पना आहे, जी पर्यावरणीय संतुलन, सामाजिक समावेश आणि आर्थिक प्रगती यांना एकत्र जोडते. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी नवोपक्रम आणि योग्य व्यापार धोरणे आवश्यक ठरतात. नवोपक्रम म्हणजे नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय पद्धती आणि धोरणात्मक सुधारणा, तर व्यापार धोरणे स्थानिक आणि जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरता आणि विकासास चालना देतात. या संशोधनाचा उद्देश शाश्वत विकासासाठी नवोपक्रम आणि व्यापार धोरणांचे योगदान विश्लेषित करणे हा आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!