Academic literature on the topic 'तलाव'

Create a spot-on reference in APA, MLA, Chicago, Harvard, and other styles

Select a source type:

Consult the lists of relevant articles, books, theses, conference reports, and other scholarly sources on the topic 'तलाव.'

Next to every source in the list of references, there is an 'Add to bibliography' button. Press on it, and we will generate automatically the bibliographic reference to the chosen work in the citation style you need: APA, MLA, Harvard, Chicago, Vancouver, etc.

You can also download the full text of the academic publication as pdf and read online its abstract whenever available in the metadata.

Journal articles on the topic "तलाव"

1

आगिवले, किशोर हिराकांत, та अरुणा गांगजी. "तलावांचे ऐतिहासिक शहर- ठाणे". International Journal of Advance and Applied Research 6, № 25(D) (2025): 73–76. https://doi.org/10.5281/zenodo.15332486.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा- </strong> &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; तलाव हे&nbsp; केवळ पाणी साठवण्याचे स्त्रोत नसून निसर्गाचे एक सुंदर आणि अभिन्न अंग आहेत. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यामध्ये तलाव महत्त्वाची भूमिका बजावतात. जैवविविधतेची साखळी टिकून ठेवण्यामध्ये तलाव महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ठाणे शहरामध्ये मोठ्या संख्येने तलाव आहेत. काही निसर्गत: तर काही मानवनिर्मित आहेत. या तलावांनी&nbsp; ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. ठाणे शहरच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासामध्ये तलावांची भूमिका&nbsp; महत्त्वाची राहिली आहे. या संशोधनाद्वारे ठाणे शहरातील तलावांचे, ठाणे शहराच्या विकासामधील योगदान जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे<strong>. </strong>याचबरोबर ठाणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण होण्यामध्ये तलावांचे&nbsp; योगदान तपासणे हाही या संशोधनाचा हेतू आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
2

सावंत, यश यादव, та डॉ.निनाद विजय जाधव. "भिवंडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या एक चिकित्सक अभ्यास." International Journal of Advance and Applied Research 6, № 31 (2025): 136–38. https://doi.org/10.5281/zenodo.15458273.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना :-</strong> ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भिवंडी तालुक्यातील वराळदेवी तलाव हे भिवंडीतील रहिवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोठे स्त्रोत आहे परंतु औद्योगिकीकरणामुळे येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येतो त्यामुळे पावसाच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेततळ्यातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे जनावरांना लागणारे पाणी यांची उपलब्धता दिवसागणित बिकट होत आहे; परिणामी संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येत आहे
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
3

प्रा., मनोहर नारायण मोरे. "शाश्वत विकासात जलसपंदाचे महत्त्व". International Journal of Advance and Applied Research 2, № 19 (2022): 5–7. https://doi.org/10.5281/zenodo.7053612.

Full text
Abstract:
&nbsp; मानवाच्या व देशाच्या विकासासाठी जलसंपदेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पाण्याचे महत्त्व सर्व मनुष्यांना, पशुपक्षांना तसेच वनस्पतींना आहे. पृथ्वीवरील पाणी हे समुद्र, तलाव, सरोवरे, भूपृष्ठ, भूगर्भ, बर्फ बाष्प&nbsp; इ. मार्गांनी प्राप्त होत असते. जलसंपदा ही निसर्गाची खूप मोठी देणगी मानवाला पशुपक्षांना व वनस्पतींना मिळालेली आहे. जलसंपदाचे महत्त्व प्रत्येक घटकांने ओळखून त्यांचा योग्य वापर केला पाहिजे. पाण्याची उपलब्धता आणि लोकसंख्या या घटकांचा विचार केल्यास पाण्याची तीव्र समस्या मोठया प्रमाणात दिसून येत असते. कारण की, जे पाणी पिण्या योग्य आहे असे गोडे पाणी पृथ्वीतलावर अत्यंत मर्यादीत आहे. शाश्वत विकासात जलसंपदाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण आपणास योग्य प्रमाणात पाणी मिळते परंतु आपण जर पाण्याचा नियोजन शून्य वापर चालू ठेवल्यास आपल्या पुढील पिढीला त्यांचा खूप त्रास होऊ शकतो त्यासाठी जलसंपदेत येणारे संकट कमी करण्यासाठी आपण सर्व मिळून पाण्याचे महत्त्व तसेच पाण्याचे संकट या संदर्भात समाजामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणार आहोत यासाठी पाण्याचे महत्त्व किंवा जलसंपदाचे महत्त्व सर्वांना समजून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
4

संग्राम, रंगराव पाटील, та नामदेव शामराव आडनाईक डॉ. "कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचे भौगोलिक विश्लेषण (२०२२-२०२३)". International Journal of Advance and Applied Research S6, № 6 (2025): 159–63. https://doi.org/10.5281/zenodo.15063519.

Full text
Abstract:
<em>कोल्हापूर जिल्ह्यातील</em><strong><em> </em></strong><em>मत्स्यव्यवसाय सार्वजनिक क्षेत्रापेक्षा सहकारी क्षेत्रात विकसित झाला</em><em> आहे.</em><em> </em><em>जलस्रोतांचे सापेक्ष महत्त्व हे दर्शविते की</em><em>, </em><em>अभ्यास क्षेत्राच्या</em><em> पश्चिम भागात या प्रदेशातील </em><em>पारंपारिक</em><em> मत्स्यपालनाची मोठी क्षमता आहे</em><em>. </em><em>अभ्यास क्षेत्राचा</em><em> पश्चिम भाग नैसर्गिक जलसाठ्यासाठी उत्तम </em><em>भौगोलिक परिस्थिती</em><em> प्रदान करतो</em><em>, तर पूर्वेकडील भागात मत्स्यपालनासाठी कृत्रिम </em><em>तलाव</em><em> बांधण्याची गरज आहे</em><em>. जलस्रोतांचे सापेक्ष महत्त्व हे दर्शविते की, राधानगरी </em><em>तालुका</em><em> प्रदेशाच्या पश्चिम भागात भूपृष्ठावरील जलस्रोतांच्या साठवणुकीसाठी अग्रेसर आहे</em><em> तेथे ४७</em><em> </em><em>टक्के </em><em>जल</em><em> क्षेत्र मत्स्यपालनासाठी वापरले गेले आहे</em><em>.</em><em> परंतु उर्वरित </em><em>तालुक्या</em><em>मधील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत वास्तविक </em><em>जलाचे</em><em> क्षेत्र समाधानकारक नाही</em><em>.</em><em> त्यामुळे ते मजबूत करणे आवश्यक आहे</em><em>. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांसह क्षारयुक्त आणि पाणी साचलेल्या मातीमुळे मत्स्यशेतीसाठी नवीन क्षमता निर्माण झाली आहे.</em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
5

डॉ., प्रमोद नानाजी घ्यार, та वाल्मीक नगराळे उज्वला. "धार्मिक सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय इतिहासातील पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे महत्वपूर्ण कार्ये". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 70–73. https://doi.org/10.5281/zenodo.7397533.

Full text
Abstract:
<strong>प्रस्तावना</strong> :- &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारतीय संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे सेवा, त्याग आणि दान धर्माला फार महत्व दिले आहे. त्याचप्रमाणे निषकाम सेवा ईश्वर भक्ती मानली जाते. राणी अहिल्याबाई होळकर हया धार्मिक होत्या. शिवभक्त होत्या पण त्या फक्त देवदेव करीत बसल्या नाही. तर त्यांनी धार्मिकतेतून लोक कल्याणकारी कामे केली. सांस्कृतिक सामाजिक कामे केली सामाजिक विकास साधन असतांनी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण केले. सामाजिक कार्ये करीत असतांनी&nbsp; त्यांनी घाट बांधले, मंदिरे बांधली तलाव व धर्मशाळा बांधल्या रस्त्यांच्या कडेला दूरदूरपर्यंत दार छाया दार वृक्ष लावण्यात आले होते. त्यांनी पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या, पाथिकांसाठी विश्रांतीगृह बांधण्यात आली व जे अनाथ आहे, त्यांना त्यांच्या जरुरी प्रमाणे मदत करण्यात आली. अहिल्याबाईचे कार्य मोलाचे आहे.&nbsp;&nbsp;सामाजिक कार्योमध्ये समाजामध्ये ज्या काही वाईट चालीरिती आहे. त्याला कडाडून विरोध केला. केशवपण, बालविवाह, सती जाण्याच्या प्रथे विरुध्द त्यांनी आवाज उठविला. शिक्षण हे पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुध्दा मिळायला हवे. तसेच सैनिकी शिक्षण हे स्त्रियांना मिळायला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या दरबारी महिलांची सैनिकी फौज निर्माण केली नविन उद्योगांना चालना दिली. समाजातील सर्व जनतेनी आत्मनिर्भर झाले पाहिजे. प्रत्येक कुटूंबातील स्त्री हि आत्मनिर्भर झाली पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी कापडा उद्योग सुरु केला आणि तो भरभराटीला आणला. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेती आणि शेतीस पूरक व्यवसायाला चालना दिली. कुटीर उद्योग सुरु करण्यात आले.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
6

Talekar, P. R. "शाहू महाराजांची सामाजिक सुधारणा व आजची वर्तमान स्थिती". International Journal of Advance and Applied Research 5, № 17 (2024): 248–52. https://doi.org/10.5281/zenodo.12198277.

Full text
Abstract:
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक असे कार्य केले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. त्यांनी आपल्या राज्यातील कार्यालयामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये दलित व मागासवर्गीयासह समानतेने व्यवहार झाला पाहिजे असे कर्तुत्व केले. दलीत लोकांशी मानवीय व्यवहार केला गेला पाहिजे. मनुष्याला मनुष्य समजणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास संभव नाही. असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित बाजारपेठ व सहकारी संस्थाची स्थापना ही व्यापारातील लबाड मध्यस्थापासून&nbsp; मुक्त करण्यासाठी करण्यात आली. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डची उपलब्धता करून दिली. अस्पृश्यांना विहिरी आणि तलाव तसेच शाळा आणि रुग्णालय यासारख्या सार्वजनिक सुविधांमध्ये समान प्रवेश प्रदान केला. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. &nbsp;त्यांनी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे त्यांच्या संस्थानात अमलात आणली. त्यांनी अनेक सामाजिक सुधारणात्मक कार्य केले त्यात प्रामुख्याने शिक्षण विषयक कार्य, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाहाला मान्यता, आर्थिक सुधारणा, आरक्षणविषयक धोरण यासारख्या सुधारणा घडवून आणल्या. शाहू महाराजांनी त्याकाळी राजेशाही असताना सुद्धा सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य होत नाही . असे अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने शाहू महाराजांना "राजर्षी "ही उपाधी बहाल केली. आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा शाहू महाराजांच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, सामाजिक व आर्थिक समतेसाठी अत्यंत गरजेचे आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
7

अनंतकवळस, प्रा. डॉ. मधूकर बाबूराव. "सोलापूर जिल्ह्यातील जलसिंचन सुविधांमुळे झालेला बदल". International Journal of Advance and Applied Research 12, № 2 (2024): 304–9. https://doi.org/10.5281/zenodo.14671464.

Full text
Abstract:
<strong>गोषवारा:- .</strong> &nbsp;&nbsp; &nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; भारत देशामध्ये एकूण १४२.६ कोटी हेक्टर जमीन असून त्यापैकी ५७ कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. देशात केवळ जेमेतेम चार महिनेच पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करून जलसिंचनाचे स्त्रोत वाढवून वर्ष भर शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाते. तसेच पिण्यासाठीचीही व इतर सर्व आवश्यक घटकासाठीची सोय केली जाते आहे. त्यासाठी नदी, तलाव, विहिरी अशा साधनांचा उपयोग करून शेती सिंचनाखाली वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर&nbsp; जिल्ह्यामध्ये भिमा ही प्रमुख नदी असून तिच्या उजवीकडील भागात निरा व माण आणि डाव्या भागात सीना व भोगावती या उपनद्या आहेत. जिल्ह्यात जलसूविधा वाढल्या त्यातून शेतकऱ्यांची बेभरवशाची शेती कमी करून एका बाजूस उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी नवनवीन प्रयोग करून फळबागांची लागवड करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूस जेधे सिंचनाची सोय उपलब्ध आहे.&nbsp; तेथे उसाचे पिक घेऊन पिकाची रिस्क कमी करून उत्पन्न घेत आहे. &nbsp;जिल्ह्यातील शेतकरी दोन्ही प्रकारची शेती करून आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.&nbsp; सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखालील क्षेत्रात जलसिंचन सुविधामुळे कास बदल होत गेला हे दिसून येते.&nbsp; २०१०-११ ओलिताखालील क्षेत्र हे २५९४०० हे. होते. ते २०२१-२२ मध्ये ३३६१०० हे. एवढे&nbsp; झाल्याचे दिसून येते. तसेच त्याच कालावधीत ओलिताखालील क्षेत्राची एकूण क्षेत्रफळाची टक्केवारी १७.४४ टक्के वरून २२.६२ टक्के झाल्याचे दिसून येते.&nbsp; तर ओलिताखालील क्षेत्राची एकूण लागवडीखालील क्षेत्राची टक्केवारी २०१०-११ मध्ये २४.७५ टक्के वरून २०२१-२२ मध्ये त्याचे प्रमाण ८५.०१ टक्के झाल्याचे दिसून येते. जिल्ह्याचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी सिंचनाचा योग्य वापर केल्यास अधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यचे प्रमाण अक्मी करून किवा त्यास सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करण्यास सक्ती केल्यास जास्त जमीन सिंचनाखाली येऊन दुष्काळी भागाचाही विकास होण्यास मदत होईल.&nbsp;
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
8

मुळीक, वसुदेव प्रभू. "वैदिक साहित्यातून दिसून येणारे पाण्याचे महत्व आणि संरक्षण". International Journal of Advance and Applied Research 3, № 5 (2022): 177–81. https://doi.org/10.5281/zenodo.7399416.

Full text
Abstract:
&nbsp;प्राचीन भारतीय वैदिक काळात ऋषीमुनींनी व संतांनी पर्यावरणाचा साकल्याने विचार केला आहे. अगदी प्राचीनकाळी अश्मयुगातील आदिमानव अन्न, वस्त्र, निवारा, पाणी व इंधन यासाठी सभोवतालच्या परिसरावर अवलंबून होता. पुढे होमोसेपियन मानवाने अग्नी, प्रगत हत्यारे व शेतीचा शोध लावून तो आसपासच्या परिसरात स्थिर होऊ लागला. नवाश्मयुगातील मानवाने प्रगती करून निसर्गातील वस्तूंचा वापर करून तो समृद्ध जीवन जगू लागला. त्यांची भटकंती थांबवून तो भोवतालच्या परिसरात स्थिर वास्तव्य करू लागला. अशा स्थिरजीवनामुळे त्याच्या जीवनविषयक कल्पना, श्रद्धा व कला विकसित होत गेल्या. तो नैसर्गिक शक्तींना देव मानू लागला. पुढे धातूयुगात कृषी व उद्योग व्यवसायांच्या प्रगतीला चालना मिळाली. आपले जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी त्याने साहित्य, कला,धर्म व नीती यांची निर्मिती केली. यातूनच संस्कृतीचा उदय आणि विकास झाला. &nbsp;साहित्य,समाज व संस्कृती यांचा पर्यावरणाशी घनिष्ठ संबंध येत असल्यामुळे मानवी जीवनावर निसर्गातील बदलणाऱ्या वातावरणाचा कळत नकळत प्रभाव पडत असतो. पर्यावरणीय संतुलन हवे म्हणून प्राचीन काळातील लोक पर्यावरणाबाबत खूप सतर्क होते.&nbsp; प्राचीन काळात वेगवेगळे साहित्य निर्माण झालेले आहे. त्यामध्ये वैदिक साहित्य हे अत्यंत महत्त्वाचे साहित्य होय.&nbsp; या वैदिक साहित्यामधून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावर लिखाण झालेले आहे.&nbsp; प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये पाण्याचे महत्व विशद करण्यात आले आहे. पृथ्वीवरील जीवाची उत्पत्ती पाण्यात झाली त्यामुळे पाणी पूर्वीपासून अस्तित्वात आहे असे म्हणता येईल. म्हणून&nbsp; वेदांमध्ये आणि प्राचीन साहित्यामध्ये जलाचे पावित्र्य व महत्त्व यावर विस्तृत प्रमाणात लेखन झालेले आढळते. पाणी हा पर्यावरणाचा एक घटक आहे. पावसाचे पाणी, नैसर्गिक झरे, विहिरी, कालवे, तलाव, नद्या आणि समुद्र इ. प्रामुख्याने पाण्याचे स्त्रोत आहेत. हे पृथ्वी, वातावरण, स्वर्ग, पर्वत, देव, माणसे, प्राणी, पक्षी, गवत, वनस्पती, कुत्रे, कीटक व मुंग्या या सर्वांना व्यापून टाकते. जल विश्वातील स्त्रोतांचा पाया आहे. पाणी हे आईसारखे असून ते जगाचे सर्वस्व आहे. जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आधार पाणी आहे.&nbsp; असे पाण्याचे महत्व सांगितलेले आहे. सजीव प्राणिमात्रांसाठी जल हेच जीवन आहे. म्हणूनच ते आतापर्यंत विकसित झालेल्या संस्कृतीचा पायाभूत घटक आहे. या संस्कृतीमध्ये कृषी व नागरी संस्कृती याच जलतंत्रावर आधारलेली आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून नदीच्या काठावर वसाहती स्थापन होत गेल्या. यातून जलसंवर्धनाची तंत्रे विकसित होत गेली आणि&nbsp; जल व्यवस्थापनाची संकल्पना अस्तित्वात आली.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
9

प्रा., डॉ. वाघाये भुवनेश्वरी मिताराम. "हडप्पा संस्कृतीचा आधुनिक भारतावर परिणाम". International Journal of Advance and Applied Research 6, № 14 (2025): 136–40. https://doi.org/10.5281/zenodo.15063374.

Full text
Abstract:
<strong>सारांश &ndash; </strong> हडप्पा संस्कृती भारतीय उपखंडातील पहिली सुव्यवस्थित नागरी संस्कृती मानली जाते, ज्याचा काळ इ. स.पूर्व २८००&nbsp; ते २५००&nbsp; दरम्यान होता. हडप्पा संस्कृतीचा प्रारंभ इ. सन. पूर्व ३५०० पर्यन असू शकतो. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली हि संस्कृती शहरी रचना, स्थापत्यकला, व्यापार, अर्थव्यवस्था,लेखन&nbsp;&nbsp; प्रणाली,&nbsp; धर्म सामाजिक संरचना,व शेती या क्षेत्रात&nbsp; अंत्यत&nbsp; प्रगत&nbsp; होती.आधुनिक भारतीय समाज,नागरी जीवन,आणि तंत्रज्ञानावर या प्राचीन संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसून येतो.हडप्पा संस्कृतीतील शहरे अत्यंत नियोजनबद्ध होती. यातील&nbsp; प्रमुख&nbsp; वैशिष्ट्य&nbsp; म्हणजे&nbsp; रस्त्यांचे&nbsp; नीटनेटके&nbsp; व्यवस्थापन, पक्क्या विटांची घरे, उत्कृष्ट जलव्यवस्थापन पद्धती, आणि&nbsp; सार्वजनिक&nbsp; स्वच्छतेवर&nbsp; विशेष लक्ष.हडप्पा&nbsp; संस्कृतीतील गटारे&nbsp; आणि&nbsp; पाणीपुरवठा&nbsp; प्रणाली पाहून त्या काळातील नगररचनेची परिपूर्णता लक्षात येते. आजच्या भारतीय शहरांच्या विकासात हरप्पा संस्कृतीच्या नगररचनेचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. रस्ते नियोजन, स्वच्छता व्यवस्थापन,आणि&nbsp; पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन यासारखे घटक हरप्पाच्या नगरयोजनेवर आधारित आहेत. स्थापत्यकलेतही हरप्पा संस्कृती अत्यंत प्रगत होती. पक्क्या विटांच्या इमारती,गढी, जलस्त्रोतांसाठी&nbsp; तलाव,धान्य साठवण्याचीगोदामे, तसेच शैलीचा प्रशस्त सभागृहे या संस्कृतीच्या स्थापत्यकलेची ओळख ठरली आज भारतीय वास्तुकलेत या शैलीचा ठसा पहायला&nbsp; मिळतो. घरांचे बांधकाम, पाण्याची साठवणूक, तसेच सामाजिक&nbsp;&nbsp;&nbsp; स्थळांचा रचना ही स्थापत्यकलेतील काही घटक आधुनिक वास्तुकलेतही समाविष्ट आहेत. व्यापार आणि आर्थिक प्रणाली मध्येहि हरप्पा संस्कृती अत्यंत प्रगत होती. ते विविध वस्त्र धातू, मातीचीभांडी,दागिने,शिल्पे यांचा&nbsp; उत्पादन आणि व्यापार करीत असत.समुद्रमार्ग आणि स्थल मार्गाचा वापर करून त्यांनी व्यापारी संबंध निर्माण केले. आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यापारी संबंधात हरप्पा संस्कृतीच्या व्यापार पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. लिपी आणि लेखनप्रणालीही&nbsp; हरप्पा&nbsp; संस्कृतीत&nbsp; प्रचलित होती.या संस्कृतीतील लिपी अद्याप पूर्णपणे&nbsp; उलगडली&nbsp; नसली&nbsp; तरी ती एक&nbsp; संगठीत&nbsp; लेखन प्रणाली असल्याचे संकेत मिळतात. आधुनिक लिपीच्या विकासात हरप्पा लिपीतील काही वैशिष्ट्यांचा प्रभाव&nbsp; आहे .धर्म&nbsp; आणि सामाजिक&nbsp; रचना&nbsp; हरप्पा&nbsp; संस्कृतीत महत्वपूर्ण होती. वर्गीय व्यवस्था,धार्मिक विधी, पुजेची पद्धती, यांचा&nbsp; ठसा भारतीय&nbsp; धार्मिक व सामाजिक व्यवस्थेत आढळतो.कृषी&nbsp; क्षेत्रात हरप्पा संस्कृतीतील&nbsp; पिकांची&nbsp; लागवड,सिंचन&nbsp; प्रणाली आणि&nbsp; जलस्त्रोतांचे नियोजन हे&nbsp; तंत्र आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देतात.सारांशरीत्या असे म्हणता येईल कि, हरप्पा संस्कृतीने आधुनिक भारताच्या अनेक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम केले आहेत. तिच्या नागरी रचना, स्थापत्यकला, व्यापारी पद्धती, सामाजिक आणि धार्मिक रचना, तसेच कृषी तंत्र यामधील योगदान भारतीय समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वपूर्ण ठरले आहे.
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
10

पाठेकर, रवि आर. "सारस – एक चिकित्सक अभ्यास". Journal of Research & Development 17, № 3 (2025): 147–53. https://doi.org/10.5281/zenodo.15294698.

Full text
Abstract:
<strong><em>गोषवारा:-</em></strong> <em>जगातील हवेत उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून गौरविल्या जाणार्या सारस पक्ष्याचा महाराष्ट्रातील अधिवास हा धोक्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकास असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ३० तर भंडारा जिल्ह्यात २ सारस पक्षी उरलेले आहेत. व्यग्र संवर्धन व वन उपज उत्पन्नावर लक्ष केंद्रित असलेल्या वनविभागाचे सारस पक्ष्याकडे दुर्लक्ष होणारी ओरड नेहमीच होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल घेत सरकारला जाब विचारला. या नंतर विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. आता सारस पक्षी व त्याचा अधिवास वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झालेले आहेत. पण सारस पक्षी वाचविण्यात प्रमुख भूमिका बजावू शकतात ते म्हणजे गावकरीच. सारस चा अधिवास हा प्रामुख्याने उत्तर व मध्य भारत, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशात आहे. मैदानी प्रदेशात पाण्याच्या आस-पास तलाव व तली यांच्या काठावर दलदलीच्या जागी किवा शेतात हा राहतो. या पक्ष्याची जोडपी असतात कधी-कधी एक दोन पिल्ले त्यांच्या सोबत असतात. गृस या प्रजातीत दहा व इतर चार अशा एकूण १४ जाती आहेत. सारस हा गिधाडा पेक्षा मोठा असून १२५०-१५२ सेन.मी. उंच असतो. मान व पाय बरेच लांब डोके आणि मानेच्या वरचा भाग लाल भडक डोक्याचा माथा राखाडी, मान व संपूर्ण शरीर निळसर करड्या रंगाची, डोळे नारंगी, चोच टोकदार व हिरवट रंगाची, पाय लांब लाल व पिसेविरहित असतात व मादी नारा पेक्षा लहान असते. सारस पक्षी झाडावर बसत नाहीत ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे धुमारे, वनस्पतीजन्य पदार्थ, किडे, सरडे, गोगल गायी इ. यांचे भक्ष आहेत. त्याना कुणाचा त्रास झाला तर ते करण्याच्या आवाजा सारखा मोठा आवाज काढतात व उडण्या पूर्वी एक आलाराम काल देऊनच उदान भारतात. उदान भरण्यापूर्वी त्यांची मान खालच्या बाजूला धनुष्याच्या आकारात असते व पंख हलके उघडलेले असतात. उडत असताना मान पुढच्या बाजूला लांब ताठ केलेली असते व पाय मागे लांब असतात. ते जमिनीपासून जास्त उंचीवर उडू शकत नाहीत मात्र त्यांचा उडण्याचा वेग जास्त असतो. उत्तरप्रदेश हे सारस चे गड आहे. येथे अंदाजे १३००० लोकसंख्या असावी असा अंदाज असून सारस ला अधिकृत राज्यपक्षी म्हणून घोषित केले गेले आहे. यातील बहुतांश लोकसंख्या हि मैनपुरी, इटावा, एता आणि अलीगड या पश्चिमेकडील जिल्ह्यात केंद्रित आहे. सारस पक्षाच्या जोडप्यावर भारतीय शास्त्रज्ञांचे रंजक संशोधन म्हणजे सारस पक्ष्याचे जोडपे मुलांच्या पालन-पोषणासाठी तिसरा जोडीदारही जोडते असे आमच्याही निदर्शनात आले. जेव्हा कि हा पक्षी जीवन भरासाठी एक पत्नी असतो असे नमूद आहे. व दुसरे म्हणजे अंडी उभाविण्याचा अधिकार फक्त मादिचाच या निसर्ग नियमालाही फाटा फोडत सारस मध्ये नर पक्षी हि अंडी उबवितो. एकेकाळी उत्तर प्रदेश , बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि आसाम मधील भातशेतीमध्ये आढळणाऱ्या या पक्ष्याची भारतातील एकूण लोकसंख्या हि फक्त १५०००-२०,००० एवढीच आहे त्यापैकी बहुतेक उत्तरप्रदेशात आहेत. तर जागतिक स्तरावर या पक्ष्याची एकूण लोकसंख्या हि फक्त २५०००-३७००० च्या मध्ये आहे. </em>
APA, Harvard, Vancouver, ISO, and other styles
More sources
We offer discounts on all premium plans for authors whose works are included in thematic literature selections. Contact us to get a unique promo code!

To the bibliography